Tuesday, April 3, 2012

पटली पाहिजे अंतरीची खूण


नुसत्या स्वरांच्या आर्तते मुळे ..एखादं गाणं पटकन आपल्या डोळ्यात पाणी आणतं ... ह्यात स्वरांचा  , संगीताचा, शब्दांचा ,कलाकारांच्या प्रतिभेचा  का ऐकणाऱ्याच्या भावनिक सर्जनशिलतेचा भाग आहे  हे समजणं कठीण आहे ...असो ! झटकन डोळे पाणावतील.. म्हणून गाणं ऐकण्या पूर्वीच काळजी घ्या!

गीत : आचार्य अत्रे , संगीत : वसंत देसाई , स्वर : आशा भोसले ,अभिनेत्री :वनमाला , ह्या सर्वांना त्रिवार सलाम !


भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण


सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरिचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली, "शालु नि पैठणी
फाडुन का देऊ चिंधी तुम्हास मी ?"
पाठची बहिण झाली वैरिण !
द्रौपदीसी .....भरजरी ग ...

द्रौपदी बोलली, "हरिची मी कोण ?
परी मला त्याने मानिली बहीण
कळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देउन प्रभू राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !"
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून
द्रौपदीसी .....भरजरी ग ...

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटली पाहिजे अंतरीची खूण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रिती जी खरी ती जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न
द्रौपदीसी....भरजरी ग ...




चित्रपट : श्यामची आई (१९५३)


हेच गाणं एका छोट्याशा मुलीने फार छान म्हटले आहे ! तिने घेतलेल्या "जागा" आणि तिचा गोड आवाज ..एकदम मस्त !


ह्या  छोट्या मुली ( अन्वी ) ला अनेक शुभेच्छा !


1 comment:

कमलेश कुलकर्णी said...

मस्त. या गाण्याकडे विशेष लक्ष गेलं नव्हतं. त्यासाठी आभारी. आणि लहान मुलीने गायलेले गाणे अप्रतिम.