Wednesday, February 29, 2012

क्विक मार्च


मार्च महिना एकंदरीत बराच व्यस्त व महत्वाचा ठरणार आहे ! क्रिकेट , राजकारण , अर्थ व्यवस्था ह्या सर्व स्थरा  वर घटना अपेक्षित आहेत ...
उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचार १ तारखेला संपला कि राजकीय ढवळा-ढवळी  ला सुरवात होईल. 
उत्तर प्रदेश विधान सभा निवडणुका देशातील अनेक समीकरणे बदलणार्या ठरतील असे वाटते . शेवटचा व ७वा टप्पा ३ मार्च ला उरकला कि देशाचे लक्ष ६ मार्च च्या मतमोजणी व निकाला कडे लागलेले असेल. महाराष्ट्रात भाजप शिवसेने ला राम राम म्हणण्याच्या तयारीत आहे ! नासिक , मुंबई व इतर महापौर पदाच्या निवडणुकीत बरेच से चित्र स्पष्ट होईल.
राजकारण आणि देशाच्या अर्थ कारणा साठी  संसदेचे अर्थ संकल्पीय अधिवेशन अतिशय महत्वाचे ठरू शकेल.

२ मार्च चा ओस्ट्रेलिया-श्रीलंका सामना हा भारताच्या क्रिकेट साठी महत्वाचा ठरू शकतो. ८ तारखेला होळी च्या दिवशी लोक कोणाच्या नावाने बोंबा मारतील हे ह्या सामन्या वर अवलंबून आहे !

५ ते १६ मार्च ह्या कालावधीत : केंद्रीय अर्थसंकल्प , महाराष्ट्रातील महापौर पदाच्या निवडणुका , उत्तर प्रदेशातील विधान सभा निवडणुकांचे निकाल , क्रिकेट च्या सी बी कप ( ऑस) व एशिया कप ( बांगलादेश) ह्या स्पर्धा , होळी, धुळवड, रंगपंचमी .. आणि पुढे २३ तारखेला पाडवा ... बोलता-बोलता पुढचे वर्ष उभे राहणार .. असा मार्च घोड दौड करणार आहे ! व्हा तैयार !


No comments: