Thursday, February 23, 2012

परिस्थिती



माणसावर परिस्थिती कधी कधी इतकी वाईट येते कि,
'हा माणूस तुटून जाईल कि काय?' अशी भीती निर्माण होते.
सगळे मार्ग बंद होतात,वाट दिसेनाशी होते,
मिळालाच एखादा मार्ग तर त्या मार्गातल्या काट्यांतून रक्तबंबाळ झाल्यावर 'तो मार्ग चुकीचा होता'
याची प्रचिती येते....'दुष्काळातला तेरावा महिना म्हणजे काय ते कळतं'
आठवण,दु:ख,गरिबी,अपयश हे सगळे गुंड एकाच वेळी एकाच माणसावर चाल करून येतात.
सगळं काही निराशवादी झालं कि, 'आता काही इलाज नाहीयेय' याची खात्री आधीच झालेली असते.
अश्या परिस्थितीत थोड्या वेळासाठी स्वतः त्या सर्व परिस्थितीतून बाहेर उभं राहायचं,
आणि
उभं राहून परिस्थितीचे टाळ्या वाजवून कौतुक करायचं...
खरंच परिस्थिती कधीकधी 'Standing Ovation' साठी हकदार असते..
म्हणायचं कि,
"वाह.....परिस्थिती यावी तर अशी यावी....
एखाद्याची गळचेपी करावी तर अशी करावी....कोंड करावी तर अशी करावी.
एक मार्ग...एक मार्ग मोकळा नाही सोडायचा."
आणि परिस्थितीचे टाळ्या वाजवून कौतुक करून झालं कि,
शेवटी स्वतःच स्वतःचं कौतुक करायचं कि,
"आपल्याकडे गमावण्यासारखं इतकं काय काय होतं,
आपल्याला झुकवण्यासाठी परिस्थितीला पण इतके कष्ट करावे लागले.
आपणही इतके अफाट आहोत..."
दु:खाच्या दरबारात वास्तव आणि मृगजळ उघडं पडतं....

व पु 






No comments: