Wednesday, February 8, 2012

खुशीची फकिरी



हि खुशीची फकिरी फार अजब असते ..हि न उतरणारीच भुतं ...

कोणाच्या जीवनाला चौकट मानवते .. कुणाचे जीवन रांगोळीच्या कणा सारखे विसकटण्यातच रमतं ...
रांगोळी चा  प्रत्येक कण जिथे पडेल तिथे आपला रंग घेवून पडतो. तशी हि माणस जिथे जातील तिथे आपला रंग टाकतात.
घरच्या चौकटीत, शिस्तशीर समाजाच्या चौकटीत त्या रंगाचा जुळता रंग नाही सापडत त्यांना .. मग आपल्याशी जमणारा रंग शोधीत हिंडतात ... ह्या माणसांची कुळ निराळी  कुळाचार निराळे !
आवश्यक गरजा सुटत नाहीत ... कितीही चुकवायच्या म्हणल्या तरी जीवनाच्या चौकटी चुकत नाहीत ... म्हणूनच असल्या प्राणांची फरफट चालू असते ! 

सभ्य संस्कृती समाजातल्या स्थानाची शिष्ठाचारांची कसलीही कुंपण त्यांना आड येत  नाहीत ..
मनाची कवाडं सताड उघडी टाकून हिंडणारी हि माणसं .. पहाणार्यांनी काय पहायचे ते सरळ पहावं डोकावून ..
भल्यांना लंगोटी आणि  नाठाळा ला काठी ! हाच अगदी साधा सूत्र मंत्र !
....
....

काही काही हस्तस्पर्शच असे असतात कि त्यांच्या हातात कण्हेर हि गुलाबा सारखी वाटते !

रावसाहेब ( पु ल ) मधून 

No comments: