Thursday, February 16, 2012

महाराष्ट्रातील महत्वाच्या निवडणुका


१६ फेब ला होणार्या नगरपालिका निवडणुका ह्या महाराष्ट्रातील राजकारणात महत्वाच्या ठरणार आहेत. २००५ साली स्थापन झालेला पक्ष  " महाराष्ट्र नवनिर्माण सेना " हा महत्वाची भूमिका बजावणार आहे.
राज ठाकरे सारखे युवा पण कसलेले मजबूत नेतृत्व महाराष्ट्रा ला मिळत आहे. म न से हा दूरदृष्टी असलेला पक्ष आहे. खंबीर नेतृत्व आणि समाजकारण समजणारा पक्ष आहे.
२०१४ साली होणार्या विधानसभा निवडणुकांची नांदी महापालिकेच्या निवडणुकांन मधून होणार आहे. पुणे , नासिक , ठाणे  आणि मुंबई मध्ये मनसे आपले आस्थित्व दाखवून देईल.
मोडकळीस आलेले जुने पक्ष आणि सेना यांना लवकरच त्यांची जागा दिसेल. नावानी " राष्ट्रवादी " पण अस्सल "जातवादी" पक्ष आज ना उद्या त्याच्या सीमित वर्गा पुरता उरेल. राष्ट्रीय पातळी वर भाजप आणि काँग्रेस , तर महाराष्ट्रात मनसे असे झाले तर नक्कीच महाराष्ट्राचे आणि राष्ट्राचे भविष्य उज्ज्वल असेल ह्यात काहीही शंका नाही.


आज होणार्या निवडणुकीत , मनसे हा एक मुख्य पक्ष म्हणून पुढे येईल . सत्तेचे समीकरण करताना मनसे कडे दुर्लक्ष करून कुठला हि पक्ष सत्ते वर येणे अवघड आहे. मनसे ची घोड दौड २०१२ च्या महानगर पालिके च्या निवडणुकीतून सुरु होईल हे नक्की. 
युवा आणि कसलेले नेते राज ठाकरे हे महाराष्ट्राचे भविष्य आहे. त्यांना अनेक शुभेच्छा !





No comments: