Sunday, March 11, 2012

रिपू दमनाचा आई भवानी आम्हाला वर दे

गेल्या काही दिवसात अनेक जुने सिनेमे व नाटकं पाहण्याचा योग आला : वासुदेव बळवंत फडके ,घाशीराम कोतवाल, रायगडाला जेव्हा जाग येते ,हि श्रींची इच्छा ,इथे ओशाळला मृत्यू ,रणांगण ...आणि  २२ जुने १८९७

"गोंद्या आला रे  ...गोंद्या आ ..ला रे"
२२ जुने १८९७ मधील हे  शब्द ऐकले कि अंगा वर एक विचित्र  शहारा असा येतो...उसळून येते रक्त .....

" धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे
  अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे " 

शंभर वर्षान वर उलटून गेली तरी अजून परिस्थिती काही फार वेगळी नाही ... गोरे जाऊन काळे आले ... एवढाच  काय तो फरक.. आज असे "रँड" सर्वत्र दिसताहेत .. चाफेकर मात्र विरळच .. कधी कधी वाटतं .. व्यर्थ गेलं ह्या वीरांच बलिदान ..  वासुदेव बळ वंतानी सांगितलेले शेवटचे शब्द हि तंतोतंत तसेच खरे होत आहेत...

" आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली
  अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ! "




नपुसक मराठे दिल्लीत जाऊन कुठल्या इटालीयन बाई चे तळवे चाटताहेत .. शिवाजी तानाजी ची वंशावळी सांगणारे आज इतिहास विसरून मुजरे करताहेत यवनांचे !   दळभद्री  नार्या  "मातोश्री " सोडून इटा लीयन झगे धुतो आहे ... राज्यात अनेक पिसाळ लेले "सूर्याजी " आणी माजलेले "भुजबळ" स्वतः च्या पिल्लांना घेवून मोकाट फिरत आहेत .. वाघाच्या पिल्लांवर भुंकण्याची हिम्मत करत आहेत ...
बाहेरील अनेक बांडगुळं आमच्या भूमिपुत्रांना लुटत आहेत आणि "कृपा " करून करोडो जमवत आहेत ..
महाराष्ट्रातील युवक मात्र झिंगलेल्या अवस्थेत निद्रस्थ आहे ... गाणी - बजावणी -नाच - सासू सुनेच्या रडक्या सिरिअल्स - फेसबुक  ह्या मध्ये मश्गुल आहे ...

"आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली
 अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली "

नुसत्या शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुका काढून बाकीचे वर्षभर "येरे माझ्या मागल्या " असे करून उपयोग नाही ... नव्या समाजाची .. नव्या राष्ट्र निर्माणाची  ... महाराष्ट्र निर्माणाची ज्योत तेवत ठेवणे महत्वाचे आहे !
क्रांती चे निखारे धग-धग तील आणि  वणवे पेटतील ...   लवकरच  हि झोपलेली युवा शक्ती जागी होईल.... आणि बोथट झालेल्या ..गंजलेल्या तलवारिना धार लावेल ...यवनांना परतवून लावेल... माजलेल्या राज्य कर्त्यांना जागा दाखवेल ... 
अश्या नव्या महाराष्ट्र निर्माणाचे ,राष्ट्र निर्माण करण्याचे व्रत घेणाऱ्यांसाठी अनेक शुभेच्छा  आणि आई जगदंबे  समोर प्रार्थना 

आई आंबे जगदंबे जातो सत्कर्मी ..जयदे 
रिपू  दमनाचा आई भवानी आम्हाला वर दे 

आम्हा नाही तुझ वाचोनी कोणी जगी आसरा 
पुण्य पतनी धर्म बुडविला रँडा ने सारा 

रिपू दमनाचा आई भवानी आम्हाला वर दे !







No comments: