Tuesday, May 21, 2013

असह्य उन्हाळा ...




उन्हाळा किती हि असह्य झाला किंवा नकोसा वाटला तरी फणस, आंबे, कलिंगडा च्या चवी मुळे मी नेहमी वैषाखा ची वाट पहात असतो. अजुन एक फळ जे मला फार आवडतं ते म्हणजे "आळू" . चिकू सारखं पण थोड गुळगुळीत आणि चवीला आंबट गोड असं हे फळ फक्त वैषाख-ज्येष्ठ महिन्यात येत.
लहानपणीचा संध्याकाळी -रात्री चा फेवरेट टाईमपास म्हणजे मित्र मंडळीं बरोबर गप्पा मारत .. कधी घरात बनवायचं पॉट-आईस क्रीम , भेळ आणि ...रात्री भुताटकीच्या गोष्टी ऐकत चरायचं ...त्या साठी  हक्काचा जिन्नस  म्हणजे .. भुईमुगाच्या शेंगा .. त्यांची ती भरमसाठ टरफलं ...एक मुठ भर खाऊ असं म्हणत आपण सहज पातेलं भर खातो आणि परत म्हणतो ..अजून थोड्या असत्या तर बरं झालं असतं .. उकडलेल्या शेंगाची मजाच काही और  .. भाजलेल्यांची चव वेगळी .. आणि  उकडून भाजलेल्या शेंगा हि एक वेगळीच चीज आहे ! ऑल टाईम फेवरेट !
आता तश्या ओसर्या किंवा गच्च्या कमीच असाव्यात ... बहुतेक असे दिलखुलास एकत्र जमण्याचे ... एका मेकाच्या घरात ऐसपैस फिरण्याची .. शेजारच्या घरात हक्कानी जाऊन एक-दोन घमेली शेंगा पोत्यातून घेण्याची प्रथा- संस्कृती हि नाहीशी होत चाललेली आहे

प्रगती म्हणजे शेजाऱ्यांना एकमेका पासून दूर ठेवणाऱ्या सिमेंट च्या भिंती .. नवी नवी सिमेंट ची जंगल उभी करणं असं समीकरण झालं आहे. हे असं किती दिवस चालणार हे माहित नाहि !
परत एकदा मला हे सगळं "नॉस्टालजिक" बनवतं आहे ! उन्हाळा लवकर संपून गेलेलाच बरां !





No comments: