Tuesday, April 23, 2013

मुंबई !



एका "पुण्यात स्थाईक झालेल्या मुंबईकरा" नी  पाठवलेली कविता ...


मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय
८ रूपयाला वडापाव आणि ...१० रु ला चाय
आला पाहुना घरी तर आखडून बसायच पाय
आणायची ९० रु किलोची चिकन सांगायच
बोकडाच मिळतच नाय
अहो पगार कमी सांगुन इज्जत गमवायची नाय
मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय ?



सकाली सकाली ९ वाजता उठायच
बिना तोंड धुता खिडकित यायच
शेजारच्या पोरीला शाळेत जाताना
हळूच म्हणायच हाय
तीने रागात पाहिल तर
म्हनायच सुंदर माझी ताय
मनातल्या मनात एक शिवी घालून बोलायच रोंग़
नंबर लागला की काय
अहो मुंबई मुंबई मुंबई तित आहे तरी काय



रिक्षाची भीड़ , गल्ली बोलातल रस्त
बाइक वाल्यांची किर किर
फेरीवाल्यांची दादागिरी
सड्लेली कोथिम्बिर
कच्च कुच्च वडापाव
आणि लघु शंका असलेली पानी पूरी खाऊन
पर प्रान्तियानाच म्हनाय्च भाय
अहो मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय


पान्या साठी पलायच , ग्याससाठी रांगा
कामाला जान्या अगोदरच
फैक्ट्री चा वाजतो भोंगा
धावत धावत टाकाव्या लागतात
ट्रेन मधे ढेंगा
ट्रेन मधल्या गर्दित
आपण असतो आत मधे
आणि बाहेरच लटकतात पाय
दादा मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय ?



साभार "पुण्यात गर्दी वाढवणाऱ्या" मुंबईकरा 

No comments: